कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

शेतकरी... शासन

 शासनाने मुद्दाम  दुर्लक्षित केलेला शेतकरी...

 हा दुरावा कधीच का मिटणार नाही...? 


आमच्याचं भाकरीवर पोसणारे...

तिलाच पारखं होणारे... 

या पाषाणांस का पाझरच फुटणार नाही...?

भ्रष्टाचाराचा खळबळ वाहणारा झरा कधीच का आटणार नाही...? 


सत्याचाच विजय होईल..

पुन्हा नवी प्रभा येईल 

मग  आशा सोडून कसं चालेल? 

कंस आलाच असेल..  तर कृष्ण कसा त्यास भेटणार नाही...?


विश्वासाचा श्वास रोमरोमी वाहू दे... 

युगाचा फक्त महिमा आहे... 

घडतंय ते घडू दे... 

तो पिळवटून घेतो रस... कस... आपला

अन् धीराचा अंत पाहतो... 

या तगमगी नंतरचा....हृदयातील दिवा शांत पाहतो

सहज मग स्मित देऊन

तोच टाकतो पुढे पाऊल

अन् उचलून घेत अलगद... म्हणतो...  

आता लागली मला तुझ्या मुक्तीची चाहूल...

 


शिल्पा श्रीकांत कुलट

अकोला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: