आत्मकथा
मी छत्री
माझी ऐटच न्यारी
मी कल्लरफूल नारी
ताईची गुलाबी, दादाची निळी, आईबाबांना कोणतीही चालते... पण आजोबांची काळी ती काळीच.
माझ्या शिवाय पावसाळ्यात बाहेरच निघायचं नाही पूर्वी कुणी.. पण आता काय...! कधी बरसंल काही नेमच नाही...
ताईच्या बॅगेत तर सदाचाच माझा वास
माझ्याविना तर तिचा एकही दिवस नाही जात.
उन्हाळ्यात मी तुमच्या त्वचेला जपते..
अश्शी मी भारी... कोपऱ्यात उभी राहते.
लेखन
शिल्पा म वाघमारे सहशिक्षिका बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा